धावती कार पेटली; नशिब बलवत्तर चौघे वाचले

Foto
मनमाडहून औरंगाबादकडे चारचाकी कारमधून येत असताना अचानक कार ने पेट घेतला.दैव बलवत्तर म्हणून कारमधील चौघे सुखरूप बचावले ही घटना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिवूर जवळील टूनकी रस्त्यावर घडली.
या घटने प्रकरणी शिवूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास दोन पुरुष, एक महिला व एक बाळ असे चौघेजण एका कार मधून मनमाड येथून औरंगाबादच्या दिशेने जात  होते. टूनकी गावाच्या रस्त्यावर त्या कार मधून धूर निघत असल्याने चौघेजण कार बाहेर पडले.त्या नंतर काही क्षणातच त्या कारने पेट घेतला व डोळ्यादेखत कार जळून खाक झाली.कार मधील चौघे जण कार सोडून इतर वाहनाने निघून गेले.घटनेची माहिती मिळताच शिवूर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.या प्रकरणी दुपारपर्यंत कार मालकाकडून पोलिसांशी संपर्क साधला गेला नव्हता. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker